वाघुंडे (ता. पारनेर, जि. नगर) येथील अविनाश व सचीन या मगर बंधूंनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतीत सातत्याने प्रयोग केले आहेत. यंदा अडीच एकरांतील कलिंगड उन्हाळ्यात विक्रीस आले. मात्र कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमध्ये पडलेले असतानाही हिमतीने थेट ग्राहक व व्यापारी असे सर्वतोपरी प्रयत्न करून एकूण सुमारे ८० ते ८५ टन मालाची विक्री यशस्वी केली. नफ्याचे प्रमाण घटले, मात्र मोठे नुकसान मात्र टळले.
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वाघुंडे खुर्द येथील ज्ञानेदव मगर हे एसटी महामंडळातील सेवानिवृत्त चालक आहेत. त्यांची दहा एकर जमीन असून पैकी चार एकर बागायत तर सहा एकर जिरायती आहे. परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. त्यातील सचिन हे
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात फलोत्पादन विभागात कार्यरत आहेत. सध्या गुजरातमध्ये आणंद कृषी विद्यापीठात ते पीएचडी करीत आहेत. बंधू अविनाश त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी पाहतात.
कलिंगडाचा प्रयोग
अन्य प्रयोग
मगर कुटूंब जिरायती क्षेत्रावर ज्वारी, बाजरी व पारंपारिक पिके घेतात. सन २०१० पर्यंत त्यांनी फूलशेतीही केली. केरळ भागातून शेवग्याचे बियाणे आणून बांधावर पंचवीस झाडे लावली आहेत. स्वतःही बियाणे तयार करून चार हजार रुपये प्रति किलो दराने तर त्यापासून तयार केलेले रोप पंधरा रुपयांला प्रति नग दराने विक्री होते.
दुष्काळाचा फटका
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वाघुंडे खुर्द येथील ज्ञानेदव मगर हे एसटी महामंडळातील सेवानिवृत्त चालक आहेत. त्यांची दहा एकर जमीन असून पैकी चार एकर बागायत तर सहा एकर जिरायती आहे. परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. त्यातील सचिन हे
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात फलोत्पादन विभागात कार्यरत आहेत. सध्या गुजरातमध्ये आणंद कृषी विद्यापीठात ते पीएचडी करीत आहेत. बंधू अविनाश त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी पाहतात.
कलिंगडाचा प्रयोग
- मगर यांनी २००४ मध्ये दहा गुंठ्यात कलिंगड घेतले. त्यावेळी चांगली मागणी होती. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी यंदा कलिंगडाचा प्रयोग केला. डाळिंबाची बाग काढल्यानंतर यंदा अडीच एकरांवर कलिंगडाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला.
- आधी हिरवळीचे खत म्हणून ताग घेतला. सचीन यांच्या ‘हॉर्टीकल्चर’ विषयातील तांत्रिक मार्गदर्शनाखाली पीक व्यवस्थापन केले. त्यातून चार किलोपासून बारा किलोपर्यत फळे मिळाली. एकरी सुमारे ४० टनांपर्यत उत्पादन घेतले.
- उत्पादन चांगले आले असले तरी संकटांशी सामना करावा लागला. तोडणीच्या काळात अवकाळी पाऊस आला. शिवाय कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट समोर उभे ठाकले. त्यामुळे एकाचवेळी तोडणीी करुन साठवणूक करावी लागली. विक्रीचा मोठा प्रश्न समोर होता. व्यापारी किलोला केवळ २ ते ३ रूपये दर देऊ करीत होते. मात्र त्यातून केवळ नुकसानच पदरी पडणार होते. मग अविनाश व वडील ज्ञानदेव यांनी खचून न जाता शक्य तेवढी विक्री थेट ग्राहकांना व उर्वरित व्यापाऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागेवर सुमारे १० टन मालाची विक्री केली.
- पुण्यात नातेवाईक असल्याने त्यांच्या मदतीने विविध निवासी सोसायट्यांना सुमारे १५ टन व उर्वरित नगर आणि नाशिक येथील बाजारपेठेत अशी एकूण ८० ते ८५ टनांपर्यंत विक्री झाली. दर किलोला सहा, सात ते दहा रूपयांपर्यंत मिळाला. अडीच एकरांत खर्च वजा जाता चार लाख रूपयांपर्यंचे उत्पन्न सुमारे ७० दिवसांमध्ये हाती आले. कोरोना संकट नसते तर किलोला १२ ते १४ रुपये दर मिळाला असता. नफ्याचे प्रमाण वाढले असते. तरीही विक्रीच्या केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमधून मोठे नुकसान होण्याचा धोका कमी झाला.
मगर कुटूंब जिरायती क्षेत्रावर ज्वारी, बाजरी व पारंपारिक पिके घेतात. सन २०१० पर्यंत त्यांनी फूलशेतीही केली. केरळ भागातून शेवग्याचे बियाणे आणून बांधावर पंचवीस झाडे लावली आहेत. स्वतःही बियाणे तयार करून चार हजार रुपये प्रति किलो दराने तर त्यापासून तयार केलेले रोप पंधरा रुपयांला प्रति नग दराने विक्री होते.
दुष्काळाचा फटका
- मगर कुटूंबाकडे कृषी विभागाचा परवाना असलेली रोपवाटिका आहे. त्यातूनच कुटूंबाचे आर्थिक स्त्रोत वाढवले आहेत. दरवर्षी डाळिंब, लिंबू, शेवगा आदींची काही लाख रोपे तयार करतात. अविनाश यांच्या मार्गदर्शनातून तयार केलेल्या डाळिंब रोपांना गुजरात राज्यात सर्वाधिक मागणी असून दरवर्षी साधारण एक लाख रोपे पाठवण्यात येतात. डाळिंबाच्या मातृवृक्षांसाठी एक एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे.
- राहुरी परिसरातील एका शेतकऱ्याकडे साई सरबती व फुले सरबती हे लिंबाचे वाण आहेत. त्यांच्या आधारे निवड पध्दतीने रोपे तयार करण्यात येतात. शेतीला पोल्ट्री व्यवसायाची जोड देताना २००८ मध्ये पाच हजार पक्षांची करार शेती सुरू केली. त्यातून दर वर्षी आर्थिक आधार मिळाला. मजूर व पाण्याअभावी गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद केला आहे.
गाईवर झालेला वार्षिक खर्च आणि आलेले उत्पादन यातील फरक पाहावा. प्रथम वेतात योग्य आणि परिपूर्ण आहार देऊनही गाईपासून ४५०० लिटर (सरासरी १५ लिटर/प्रति दिन ) उत्पादन न मिळाल्यास ती गाई विकून नवीन खरेदी करावी.
सर्वात महत्वाचे जास्त दूध देणाऱ्या गाईपासून जास्तीत जास्त कालवडी कश्या मिळतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आणि विज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आपण गाई भरवताना डॉक्टरकडे SEXED SEMEN ची मागणी करावी.
आपणास आवश्यक असणारे पशु खाद्य आणि इतर बाबी जसे कि खनिज मिश्रण इत्यादी शेतकरी गट तयार करून होलसेल दराने खरेदी करावे. तसेच शेण वर्षभर साठवून न ठेवता त्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत बनवुन विक्री करावे किंवा स्वतःसाठी वापरावे.
www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*
प्रगतिशील शेतकरी, कृषितज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी संस्थांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी व शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहे. सर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहे. पण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. आज प्रत्येक जण लेखक आहे. प्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञान, सल्ला, कृषीविषयक माहिती, महत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. जगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. कृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीसल्ला, उपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध करा. कृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी व तज्ञांनी आपले लेख, माहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.*मोफत जाहिरात : आपली कृषी विषयक उत्पादने व सेवांची
*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*
www.shetisalla.com नियम व अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज व टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावे. कॉपी नसावे.
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |
0 Comments